देश आणि मी ......
आयुष्यात कोणताही गोष्ट सहज मिळाली तर तिची किंमत राहत नाही मग ते रोजच्याच आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी असो किंवा मिळालेलं स्वातंत्र्य असो. त्याची किंमत राहत नाही. आज जे बाहेर वातावरण आहे त्यावरून हे नक्कीच वाटतं कि आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळालं पण आज त्याची किंमत , जाणीव मात्र आपण ठेवायला विसरतोय. हवी असलेली एखादी गोष्ट/ वस्तू मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागेले नसतील तर त्या गोष्टीबद्दल जास्त जाण रहात नाही , जरी ती गॊष्ट / वस्तू आपल्यापासून दुरावली तरीही त्याचा जास्त त्रास , कष्ट होत नाही पण तेच जर आपण खूप कष्टाने ती वस्तू/गोष्ट जेव्हा मिळवतो , तेव्हा मात्र आपण तिला जपतो , तिची जाणीव ठेवतो. ती आपल्यापासून दुरावणार नाही याची काळजी घेतॊ आणि जरी दूर गेलीच तर पुन्हा प्रयत्न , कष्ट करून ती मिळवतोच. याचं अगदीच एक साधं उदाहरण द्यायचे झालं तर एखाद्या दिवशी जेवणासाठी खूप प्रयत्न करूनही जेवणासाठी अन्नच मिळालं नाही त्...