पत्रास कारण की ..............
परवा सहजच बाहेर निघालो तेव्हा खाकी वेशात , टोपी घातलेला , एक विशिष्ट बॅग खांदयावर घेऊन जातांना एक व्यक्ती दिसला आणि ती व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून पॊस्टमन काका आहेत हे लक्षात आलं . आजच्या २१ व्या शतकात ' पत्र ' बऱ्याच लॊकांना outdated वाटतं . Email , WhatsApp , Telegram , SMS व अजून इतर यांच्या काळात ' पत्र ' कुठे आणि कधी हरवलं हे लक्षातच आलं नाही कधी . आजच्या नव्या पिढीसाठी 'पत्र ' ही संकल्पना राहिलेलीच नाही , आणि संदेश वहनासाठी पत्र आणायला, ते लिहायला , ज्याला पाठवायचं आहे त्याचा पत्ता शोधून , ते Post Office / Post Box पर्यंत जाऊन ते त्यात टाकायला , परत त्या टाकलेलं पत्र मिळाल्यानंतर त्याचा प्रतिसाद मिळेल तो पर्यंत थांबायला कोणाला वेळ आहे ????? आज का जमाना सब Instant का है . मला वाटलं मी लगेच phone केला, Video Call केला , ...