पोस्ट्स

तो............................

इमेज
                          तॊ ............. जन्माला आल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात  मुलगा , भाऊ , मित्र , नवरा आणि बाबा ( वडील ) अशी विविध नाती तो सर्मथपणे  सांभाळत असतो.  विद्यार्थी दशेत चांगलं शिक्षण घेतलं तर तारुण्यात चांगली नोकरी/ व्यवसाय  करता येईल. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर  घरातले  खर्च , घरात राहणाऱ्या माणसांची आर्थिक आणि मानसिक आरोग्य ह्याची  जबाबदारी , त्यात कोणतीही परिस्थिती जर उद्भवलीच तर ते आर्थिक नियोजन करणं असतंच . लग्नासाठी  साथीदार म्हणून त्याची निवड ही   तो माणूस म्हणून कसा आहे ह्या पेक्षाही  त्याच्या आर्थिक निकषांवर , त्याच्या वार्षिक उत्पन्नावर (  salary package)   , तो कोणत्या शहरात राहतोय ह्यावरून त्याची निवड केली जाते. त्याच्यासाठी लग्नानंतर नव्या नात्यांसोबत जुळवून घेत असतांनाच असेलेली (जुनी) नाती तितक्याच प्रेमाने जपायची असतात. वडील म्हणून जबाबदारी स्वीकारतांना पाल्याला  कोणत्याच गोष्टींची कमतरता पडू नये म्हणून ...

दान....

इमेज
                                                               दान म्हणजे आपल्या जवळ जे आहे, ते स्वतःहून चांगल्या भावनेने, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता आणि सगळ्यात महत्वाचं आनंदाने  जे मनापासून दिलं  जातं ते  म्हणजे दान..... दान हे कधीही कोणावर लादता येत नाही. आपल्या संस्कृतीत सुद्धा दान  खूप महत्वाचं  आहे. आपल्या उपनिषदांत  विकसित व्यक्तीसाठी तीन महत्वाचे गुण आत्मसात / शिकण्यासाठी सांगितलेले आहेत. सयंम, दान  आणि दया.     ।। तदेतत्त्रयँ शिक्षेद् दमं दानं दयामिति ।।   ऋग्वेदात  दान या बद्दल खूप गोष्टी सांगिलेल्या आहेत. ऋग्वेदानुसार दान म्हणजे सत्य. चांडोक्य  उपनिषदानुसार समस्त मानव जातीसाठी जीवन जगतांना  तप, आर्जव, सत्यवचन  अहिंसा आणि दान   हे महत्वाचे सांगितलेले आहे. या वरूनच आपल्याला  असं  लक्षात येतं  की  व्यक्तीमत्व ...

मी माझा ........

इमेज
                      प्रत्येकासाठी त्याचं  नाव हे   महत्वाचं असतंच. जन्म झाल्यावर पालकांना जे योग्य वाटतं त्याप्रमाणे ते नाव ठेवतात,आणि व्यक्तीला त्या नावाने ओळख  मिळते. जन्माच्या  दाखल्यापासून  नावाचा हा  प्रवास सुरु होतो . त्यावेळी   जेव्हा कधी आपण स्वतःची ओळख करून देतो , तेव्हा मी ......  , मी ......  शिक्षण घेतलं  आहे आणि ....... काम करतो / पदावर कार्यरत आहे . सगळ्यांनाच स्वतःची  त्या असलेल्या नावाने असो वा  कर्तृत्वाने एक विशेष ओळख आहेच. समाजात वावरत असतांना जी ओळख असते तीच त्यांचं अस्तित्वच होऊन जाते.                       खरं तर आयुष्य हे रंगमंच आहे आणि आपण प्रत्येकजण आपआपली  भूमिका सादर करतोय .ह्या बद्दल मराठी साहित्यात संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली  हेच म्हणतात . तसंच  जग विख्यात कवी आणि नाटककार  विल्यम शेक्सपिअर  ह्यांच्या  As You Like It ह्या नाटकात  ...

प्रेम.............

इमेज
                    'प्रेम' या शब्दातच खरं तर खूप सारा अर्थ लपलेला आहे. आजपर्यंत प्रेमाबद्दल खूप जणांनी सांगितले आहे, बरंच  काही लिहलेलं आहे. नक्की प्रेम म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मते प्रेम दुसऱ्यांबद्दल  वाटणारी आदर आणि आपुलकीची भावना. ज्यात आदर आणि आपुलकी सॊबतच विश्वासही आहे. आपल्याला ह्या भावना ज्या कोणाबद्दल वाटतात त्यांच्यावर आपण प्रेम करतॊ असं म्हणायला काहीही हरकत नाही. माझ्या मते प्रेम आणि नातं ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. ते असं कि , " आयुष्यात नेहमी प्रेम करून असलेली नाती आणखी घट्ट करावीत आणि प्रेम करून आणखी नवीन नाती जोडत जावी ".                     आज  मला असं वाटतं  की  आजच्या आपल्या प्रेमाबद्दलच्या असणाऱ्या विचारांवर चित्रपटांचा खूप प्रभाव आहे. त्यामुळेच आपलं प्रेम असण्याची ,ते व्यक्त करण्यात असणारा सहजपणा ,साधेपणा आपण विसरलोय. आजही काही लॊकांच्या मते  प्रेम म्हणजे एखादा मुलगा आणि मुलगी नेहमी सोबत एकत...

नविन वर्ष ............

इमेज
                                         सांस्कृतिक दृष्टीने आपलं  नवीन वर्ष हे कोणत्याही महिन्यात / तिथीने सुरु हॊत असलं  तरीही आपल्या सगळ्यांच्याच  व्यावहारिक आयुष्यात तारखेला खूप महत्व आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात जन्माच्या दाखल्यापासून सुरु झालेला हा तारखांचा प्रवास आपल्या मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अविरतपणे सुरूच असतो. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यात काही विशिष्ट तारखा आणि काही  महिने ह्या खूप महत्वाच्या असतात आणि  त्याच्या अश्या बऱ्याच आठवणीही असतात .                       एक सहजच उदाहरण द्यायचं  झालंच  तर आपला / आपल्या जवळच्या माणसांचा पहिला  वाढदिवस,  जून महिन्यात असलेला पहिला शाळेतला दिवस, मार्च/ एप्रिल मध्ये असणाऱ्या शालांत  ( वार्षिक) परीक्षा, १० , १२ वीच्या असणाऱ्या फेब्रुवारी /मार्च महिन्यात असणाऱ्या परीक्षा,नॊकरीचा पहिला दिवस,  कोणतीही नव...

मोठं ........

इमेज
                    मो ठं ..... होणं म्हणजे नक्की काय ???? आणि कधी समजायचं मोठं झालोय ते.  लहान असतांना  आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडलेला हा प्रश्न आणि त्यात आपण जर भावंडात लहान असतो तेव्हा तर खूप वेळा मनात आलेला ,  परिस्थिती अनुभवतांना  पडलेला हा प्रश्न ( मी कुटूंबात शेंड फळ आहे  म्हणूनच हे मी अगदी माझ्या स्वानुभवावरून सांगतोय 😀😀) त्यावेळी तू हे करू नकोस  लहान आहेस . लहानपणी एखाद्या गोष्टीसाठी  हट्ट  केल्यावर तू  मोठा झाल्यावर नक्की असं  म्हणून सगळ्यांच्या पालकांनी ती  हट्टाची वेळ कितीतरी तरी वेळा सहज हाताळली असतेच.                      मोठ्या माणसाबद्दल सर्व सामान्य कल्पना अशी की सदर  व्यक्ती  जर एखाद्या उच्चपदावर कार्यरत असेल , जर त्यांच्याकडे खूप आर्थिक विद्वत्ता असेल , त्याच्या खूप प्रसिद्ध आणि  उच्चपद घोषवणाऱ्या व्यक्तींसोबत नियमित उठणं -बसणं  असणाऱ्याला तो व्यक्ती मोठा माणूस आहे असं  म्हंटलं...

बाबा .....

इमेज
                           बाबा .... असं   व्यक्तिमत्व जे प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक महत्वाचा भाग असतॊ . फक्त आपल्या नावाला ओळख देण्याइतकंच  नाही तर त्याहून कितीतरी पट  जे कधीच शब्दांत  मांडता येणार नाही असे. आपले बाबा .... जे प्रत्येकासाठी त्यांच्या आयुष्यातले पहिले हिरो/ प्रेरणा असतात . विश्वासाने ज्यांचं बोट अगदी घट्ट धरून कोणत्याही प्रवासासाठी नेहमी तयार असायचो, ज्यांच्या  खांद्यावर उभं राहून हे जग बघतांना  . आपल्याला नेहमीच त्यांच्या सारखंच बनायचं असतं हे बाबाच असतात. लहानपणी त्या भातुकलीच्या खेळात कितीतरी वेळा त्यांचं अनुकरण केलेलं असेलंच.                           खरं तर बाबांबद्दल मी काय लिहणार ?????  कसं  लिहणार ??????  ज्यांना मी २९ वर्षांपूर्वी गमावलं , खूप लहान असल्यामुळे  ज्यांचा मला खूप सहवासही  नाही मिळाला , जास्त आठवणी सुद्धा नाहीत. फोटोतल्या काही थोड्या आठवणी आहेत इतकंच ....

शुभ विवाह .............

इमेज
                              मनुष्य  हा जन्माला आल्यापासून तर  मृत्यू पर्यंत त्याच्या आयुष्यात काही टप्पे  येतात. जसे की बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व. जितकं माणसाचं आयुष्य त्याप्रमाणे तॊ  ह्या टप्प्यातून जात असतो. आपल्या संस्कृतीत आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून आणि खूप दूरदृष्टी ठेवूनच ह्या टप्प्यात असलेल्या वयात कोण- कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचं ह्याची आपल्या शास्त्रांत  खूप सूत्रबद्ध मांडणी केलेली आहे. तसं  बघायला गेलं  तर हे सगळेच टप्पे हे महत्वाचे आहेतच. पण  त्यातला १ टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. हिंदू धर्मात मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत  १६ संस्कार सांगितलेले आहेत त्यात लग्न हा सुद्धा एक महत्वाचा संस्कार आहे. शास्त्रात आपल्याकडे नवं  दाम्पत्याला लक्ष्मी -नारायणाची उपमा दिली  जाते . ह्यावरूनच आपल्या संस्कृतीत ह्या नात्याला किती पावित्र्य आणि महत्वं आहे .                        ...

वेदना ...................

इमेज
                                                     वेदना........... ह्या पृथ्वीतलावर असा कोणताच सजीव प्राणी नसेल ज्याने  वेदना कधीच अनुभवलेल्या  नसतील. शारीरिक वेदना तर ह्या सगळ्यांना सारख्याच असतात. शारीरिक वेदनेचं  स्वरूप कमी जास्त प्रमाणात असलं तरीही भावना तर त्याच असतात . वेदना  म्हणजे  नक्की काय अशी व्याख्या तर नाहीये . कारण वेदना हा एक अनुभव आहे आणि तो  प्रत्येकासाठी वेगळा असतो. वेदना हा असा अनुभव आहे जो  ज्याला त्याला आपला आपलाच घ्यावा लागतो.काही शारीरिक वेदना ह्या क्षणिक असतात  तर काही दूरगामी असतात . काही शारीरिक वेदनांसाठी  कधी कधी साधी हवेची फुंकर सुद्धा पुष्कळ असते तर काही वेदनांना कितीही औषध घेतलं तरीही वेदना कधी कमी होत नाहीत. मानसिक वेदनांच्या बाबतीत अगदी तसेच असतं  ना त्यावर  कोणतं  औषध  घेता येतं  आणि ते कधी बरं  होईल ह्याचा काही ठराविक कालावधी असतो.  ...

अपयशातलं समाधान .......................

इमेज
                    अपयशातलं  समाधान वरील  हे शीर्षक वाचून थोडसं गोंधळलात  ना  ??  काही चुकीचे  वाचलंय ,   का शब्दांची अदलाबदल  झाली ?   असे विचार तुमच्या मनात येणं  अगदी स्वाभाविक आहे. कारण मुळात अपयश आणि समाधान हे तसे  परस्पर विरोधी शब्दच. आपण बघतो की अपयश असलं तर नेहमी त्यात दुःख आणि  निराशा असते  त्यात अपयश हे समाधान शब्दासोबत वाचायला थोडं  विचित्र वाटलं असेल . या शब्दातच खूप विरोधाभास आहे .पण हो मी म्हणतोय की अपयशातलं  समाधान..........                     ज्याप्रमाणे सुखः आणि दुःख म्हणजे नक्की काय , ते कसं आणि कशामुळे  मिळतं ह्या बद्दल प्रत्येकाचं  एक वेगळं  मत आहे,  तसंच यश-अपयश  या बद्द्दल सुद्धा नक्कीच असू शकतं. आणि ते मत आपण कोणावरही लादू शकत नाही. ज्याला - त्याला याचं स्वातंत्र्य नक्कीच आहे.  काहींना त्यांचा  आवडता पदार्थ खायला मिळाला तर त्यांना आनंद होतो काही...